-->
  केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही; विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही; विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे

 

AURANGABAD -  आज बुधवार एक फेब्रुवारी रोजी विरोधी पक्षनेते अंबादास धनवे यांनी माहिती दिली आज केंद्राने अर्थसंकल्प सादर करण्यात आला मात्र या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काहीच मिळाले नसल्याची भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना आज रोजी व्यक्त केली आहे.शेतकऱ्यांना कापसासाठी हमीभाव देण्यात आला होता मात्र या संदर्भात अर्थसंकल्पात कोणत्याच प्रकारची तरतूद करण्यात आली नाही,महाराष्ट्रात शिंदे आणि भाजप सरकार असून मात्र सदरील सरकारने केंद्र सरकारकडे कोणत्याच प्रकारची मागणी केली याची दिसत नसल्याचे आजच्या अर्थसंकल्पावरून दिसून आले आहे.महाराष्ट्राच्या जुळी मध्ये केंद्र सरकारने काहीच टाकले नसल्याची टीका आज रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.महाराष्ट्राची तील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा होत्या या अनुषंगाने महाराष्ट्रातील नागरिकांनी अर्थसंकल्पाकडे डोळे लावले होते मात्र महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणात कोणत्याच प्रकारची तरतूद करण्यात आलेली नसून या अर्थसंकल्पाचा महाराष्ट्राला कोणत्याच प्रकारचा फायदा झालेला दिसत नसल्याची भावना आज रोजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.



0 Response to " केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळाले नाही; विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे"

टिप्पणी पोस्ट करा

Recent

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article

Youtube Channel Image
Loksawal News For YouTube Video News Subscribe Now
Subscribe