रजिस्ट्रीचा मार्ग कधी होणार मोकळा ? याचिकाकर्ता पोहचले थेट औरंगाबाद रजिस्ट्री कार्यालयात या नंतर जे घडले- वाचा सविस्तर बातमी
मंगळवार, १७ मे, २०२२
Comment
१७ मई रोजी रजिस्ट्री कार्यालयात तुकडेबंदी कायदेबाबत मा.कोर्टाचे निकाल लागल्यापासुन किमान ७ दिवसाहुन अधिक दिवस झालेले असुन सुध्दा अद्याप रजिस्ट्री चालु करण्यात आलेले नसल्याचे याचिकाकरता यांनी लोकसवाल न्यूजशी बोलतांना सांगितले. रजिस्ट्री चालु करा अनेक लोग यामुळे त्रस्त झाले आहे परंतु आजही सुध्दा आमची तुकडेबंदी संबंधीत रजिस्ट्री करण्यात येत नाही. रजिस्र्टार यांना लेखी लिहुन द्या अशी मांगणी करण्यात आलेली आहे परंतु या बाबत ए.के.तुपे जनमाहिती अधिकारी तथा हस जिल्हानिबंधक वर्ग -२ औरंगाबाद यांनी सांगितले की, या बाबत वरिष्ठांचे काहीही आदेश अद्याप आम्हाला मिळाले नाही. परंतु याचिकाकर्त्यानी सांगितल्यानुसार आज रोजी रजिस्ट्री कार्यालयात कुठ्लायाही प्रकारचे काम बंद नाही.
ए के तुपे सह जिल्हा निबंधक वर्ग २ औरंगाबाद |
रजिस्ट्रीसाठी वरिष्ठांशी संवाद करुन सुध्दा अद्याप नागरीकांना याचा उत्तर देण्यात आलेले नाही. शासन किंवा रजिस्ट्री अधिकारी यांच्याकडुन फक्त या बाबत आश्वासन देण्यात येत आहे व या बाबत वरिष्ठांचे आदेशाची वाट बघण्यात येत आहे असे उत्तरे देण्यात आली आहे. परंतु या बाबत कधी मार्ग मोकळा होईल जेणे करुन सामान्य नागरीकांना आपले रजिस्ट्री करणे सोपे होईल. तरी या बाबत रजिस्ट्री कार्यालयातील एक्सक्लुसिव बातचीत केल्यानंतर त्यांनी सांगितले आहे की, या बाबत वरिष्ठांची लवकरात लवकर बोलने करुन या बाबत उत्तर देण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे.
0 Response to " रजिस्ट्रीचा मार्ग कधी होणार मोकळा ? याचिकाकर्ता पोहचले थेट औरंगाबाद रजिस्ट्री कार्यालयात या नंतर जे घडले- वाचा सविस्तर बातमी"
टिप्पणी पोस्ट करा