औरंगाबाद सिटीचौक येथे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल-वाचा सविस्तर माहिती
औरंगाबाद : १ मे रोजी औरंगाबाद येथे केलेल्या भाषणासंदर्भात सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरुद्ध प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपात गुन्हा दाखल झाला आहे.राज ठाकरेंवरील कारवाईसंदर्भात गृहमंत्रालयाची आज सकाळपासून खलबत सुरू होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस महासंचालकांसह गृहमंत्रालयाचे अधिकारी आणि इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललेत. राज ठाकरे यांना या सभेला परवानगी देण्यापूर्वी औरंगाबाद पोलिसांनी १६ अटी टाकण्यात आल्या होत्या.
यात समाजिक सलोखा बिघडू नये, दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, कोणाच्याही भावना दुखावू नये, चिथावणीखोर वक्तव्य करू नये याचा समावेश होता. राज ठाकरेंच्या या भाषणादरम्यान बहुतांश अटी आणि शर्तींचे उल्लंघन झाले असा दावा पोलिसांनी केला आहे.
महाराष्ट्र पोलिस हाय अलर्टवर झाले आहे:
राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत ते म्हणालेत की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एसआरपीएफच्या ८७ तुकड्या आणि ३० हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तसेच १५ हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून १३ हजार जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
0 Response to "औरंगाबाद सिटीचौक येथे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल-वाचा सविस्तर माहिती"
टिप्पणी पोस्ट करा