औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची संरक्षण भिंत न बांधल्यास मनपाला टाळे ठोकणार- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी
औरंगाबाद प्रतिनिधी, औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी बस स्थानक येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची संरक्षण भिंत मागील 6 महिन्यापासून पडली आहे 19 तारखेला शिवजयंती आहे 18 तारखेच्या अगोदर जर संरक्षण भिंत मनपाने बांधली नाही तर मनपाला टाळे ठोकू असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष खाजा शरफोद्दीन मुल्ला यांनी सांगितले मुकुंदवाडी येथील पुतळ्याची संरक्षण भिंत बनवून द्या या मागणीसाठी राष्ट्रवादीचे मोतीलाल जगताप यांनी या अगोदरच निवेदन दिले असून देखील काम झाले नाही 28/ 1 /2020 रोजी मनपा अतिरिक्त आयुक्त बीबी नेमाने यांची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि पुतळ्याची संरक्षण भिंत बांधून देणे, सुशोभिकरण करणे आदी मागणीचे निवेदन सादर केले संरक्षण भिंत तुटल्याने त्याठिकाणी दारुड्यांचा सुळसुळाट आहे महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न शहराध्यक्षांनी याठिकाणी उपस्थित केला.याप्रसंगी माजी नगरसेवक राजाराम मोरे, माजी विरोधी पक्षनेते राजेश मोरे ,राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष मोहम्मद हबीब मुन्नाभाई, जावेद खान, तय्यब खान, शेख नवाज, इलियास किरमानी ,कार्तिक कांदे ,इब्राहिम पठाण ,आसेफ शेख,अशोक बन्सवाल आदी उपस्थित होते अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या निवेदनावर विचार करून लवकरच काम करण्यात येईल असे आश्वासन दिले.
0 Response to "औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची संरक्षण भिंत न बांधल्यास मनपाला टाळे ठोकणार- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी"
टिप्पणी पोस्ट करा