RTE प्रवेश प्रक्रियेमध्ये झाले काही बदल जाणून घ्या फक्त एक क्लिक वर
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. त्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. परंतु, राज्य सरकारने आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या प्रक्रियेत बदल केला आहे. या नव्या बदलानुसार आता सरकारी किंवा अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात खासगी शाळा असेल, तर संबंधित शाळेत या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश दिला जाणार नाही, असे निश्चित करण्यात आले. त्यानुसार, आता राज्यात ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाच्या मार्गदर्शक सूचना प्राथमिक शिक्षण विभागाने एप्रिलच्या सुरवातीला जाहीर केल्या होत्या. त्यात प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शाळा प्रवेशाचा प्राधान्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यात, संबंधित बालकांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित, शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील, आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यित शाळेत मुलांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.दरवर्षी राज्यातील लाखो पालक आरटीईअंतर्गत होणाऱ्या या प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असतात. परंतु, यंदा एकूणच प्रवेश प्रक्रियेला झालेला विलंब आणि त्यातही कायद्याच्या तरतुदीत केलेला बदल यामुळे पालक हवालदिल झाले आहे
0 Response to "RTE प्रवेश प्रक्रियेमध्ये झाले काही बदल जाणून घ्या फक्त एक क्लिक वर"
टिप्पणी पोस्ट करा