औरंगाबादेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, कोरोना काळात पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद
पुढे बोलतांना गृहमंत्री म्हणाले की, औरंगाबाद परिक्षेत्रातील गुन्ह्यांचे प्रमाण अधिक असल्याने पोलिसांनी अधिक सक्षमपणे तपास करणे गरजेचे आहे. पोलिस दलात कर्मचारी हा घटक महत्वाचा असून त्याची तपासात देखील भूमिका महत्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणुन घ्या आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य द्या. लोकप्रतिनीधींच्या बाबतीत असणारा राजशिष्टाचार प्राधान्याने पाळा. डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल. पोलिस सेवेत कर्मचारी दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी किमान पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवानिवृत्त व्हावा, त्यादृष्टिने योजना बनविण्यात येत आहे. जिल्ह्यांमध्ये पोलिस दल अधिक सक्षम बनविण्यासाठी जिल्हा वार्षिक निधीतुन निधीची मागणी करा. कोरोना काळात पोलिस दलाने कौतुकास्पद कामगिरी केल्याचेही गृहमंत्री म्हणाले.
बैठकी दरम्यान उपस्थित पोलिस अधिक्षकांनी आपआपल्या जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती गृहमंत्र्यांना दिली. गृहमंत्र्यांनी बैठकीपूर्वी आयुक्तालयातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाला भेट दिली. बैठकीमध्ये विविध पुस्तिकांचे विमोचन गृहमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले.
0 Response to "औरंगाबादेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, कोरोना काळात पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद"
टिप्पणी पोस्ट करा