औरंगाबाद रजिस्ट्री कार्यालयावर तोंड बंद मोर्चा
मंगळवार, २३ मे, २०२३
Comment
लोकसवाल न्यूज़: औरंगाबाद रजिस्ट्री कार्यालयावर तोंड बंद मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाची मुख्य मागणी आहे की भ्रष्ट अधिकारी म्हणजेच रजिस्ट्रार (दुय्यम निबंधक) यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. सामान्य माणसाचा आणि शेतकऱ्यांचा विचार न करता त्यांच्याकडून तीस ते चाळीस हजार रुपयाची लाच रजिस्ट्रार घेत असल्याचे आरोप या मूक मोर्चा द्वारे लावण्यात आलेले आहे.औरंगाबाद रजिस्ट्री कार्यालयाचे दोन रजिस्टर वर मुख्य कारवाई करण्याचे मागणी या मोर्चाकडून करण्यात आलेले आहेत. जास्त पैसे घेऊन सामान्य माणसांना व शेतकऱ्यांना गंडा घालण्याचे कार्य रजिस्ट्री कार्यालयामार्फत होत असल्याचे आरोप करण्यात आलेले आहेत. औदुंबर लाटे व बालाजी ज्ञानोबा माधस्वार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
0 Response to "औरंगाबाद रजिस्ट्री कार्यालयावर तोंड बंद मोर्चा"
टिप्पणी पोस्ट करा