सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; शासकीय कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले समाधान
बुधवार, २२ मार्च, २०२३
Comment
SOLAPUR : २००५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी या मागणीसाठी ४० दिवसापुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस दिली होती. परंतु सरकारने कोणतीही बैठक घेण्याची तडजोड केली नाही. त्यामुळे सरकारच्या या धोरणामुळे संप करण्यात आला होता.
परंतु आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपुर्ण पदाधिऱ्यांबरोबर चर्चा बोलावली. त्याचर्चेत त्यांनी जुनी पेन्शन संदर्भात लेखी पत्र दिले आहे. ३ महिन्याच्या आत हा प्रस्ताव मार्गी लावु असे आश्वासन दिल्यामुळे जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरु असणारा संप आज शासकीय कर्मचाऱ्यांनी मागे घेतला आहे. याबाबत सोलापुरातील कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केल आहे. सध्या राज्यातील परिस्थिती पाहता दोन पावलं मागे घेत असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
0 Response to "सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे; शासकीय कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले समाधान"
टिप्पणी पोस्ट करा