
ज्यांना पक्षात यायचे आहे त्यांचे आम्ही स्वागत करु -चंद्रशेखर बावनकुळे
NAGPUR- वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत केलेलं वक्तव्य हे विक्षिप्त पणाने केलेले आहे. महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही.
- प्रकाश आंबेडकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबाबत बोलले हे मानसीक दिवाळखोरीचं लक्षण आहे.
- आमच्या नेतृत्त्वावर टीका टिपणी केली तर राज्यभरात प्रकाश आंबेडकर यांचा निषेध व्यक्त करावा लागेल.
- अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे त्याचा उद्रेक होईल असं वाटत आहे.
- या जागांवर यापूर्वी विधानपरिषद निवडणूकीत जे निकाल आले, त्यापेक्षा हे निकाल चांगले असतील.
- सहावर्षीच्या निकालात आणि या निकालात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या युतीला जास्त यश मिळालं असेल.
- चार जागा आम्ही लढवल्या होत्या, नागपूरच्या जागेवर आम्ही समर्थन दिलं होतं, आणि सत्यजित तांबे यांना स्थानिक भाजपने समर्थन दिलं होतं
- स्थानिक स्तरावर सत्यजीत तांबे यांना भाजपने मदत केली आहे.
- निकाल चांगले येतील
- सत्यजीत तांबे पुर्ण मानसीकतेने आमच्याकडे आले तर स्वागत आहे. आमची त्यांना भाजपात घेण्याची तयारी आहे
- सत्यजीत तांबे यांनी निर्णय घ्यावा, ते आले तर आम्ही कधीही तयार आहोत. पक्षात अनेक लोक आले. सत्यजीत तांबे आले किंवा इतर कुणी आले. पक्षात यायला अडचण नाही. सत्यजीत तांबे आले तर आम्ही स्वागत करु.
0 Response to "ज्यांना पक्षात यायचे आहे त्यांचे आम्ही स्वागत करु -चंद्रशेखर बावनकुळे "
टिप्पणी पोस्ट करा