आजच्या बैठकीत झाला निर्णय, महाराष्ट्रात लॉकडाउन नाही, परंतु निर्बंध कडक होणार
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि या पार्श्वभूमीवर ही अत्यंत तातडीची आणि महत्वाची बैठक आज सकाळी नऊ वाजेपासून पार पडली आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात होती. बैठकीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच टास्क फोर्सशी चर्चा करण्यात आली या बैठकीत असे निर्णय झाले की, राज्यात सध्यातरी लॉकडाउन लागणार नाही परंतु निर्बंध कठोर करण्यात येईल अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आलेली आहे
या बैठकीत झालेलं अहवाल हे आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात येईल व आज रात्रीपासूनच ही कडक निर्बंध राज्यात लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रेस्टॉरंट आणि हॉटेल यासंदर्भात सुद्धा आज रात्री नवीन नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच बैठकीत सांगितले आहे की काही कठोर निर्बंध फक्त कागदी पत्रात राहिलेले आहे त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून त्याची अंमलबजावणी करावी लागेल असे बैठकीत ठरविण्यात आलेले आहे. ज्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतलेले नाही त्यांना सार्वजनिक ठिकाणी वाहतूक करता येणार नाही याचीही सक्ती राज्य सरकार करणार आहे.
राज्यात लॉकडाऊन जरी लागला नाही, तरी निर्बंध अधिक कठोर करण्यात येईल हे या बैठकीनंतर स्पष्ट करण्यात आलेले आहे. हे निर्बंध आज रात्री पासूनच लागू करण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे तरी लॉकडाऊन लागलेला नाही परंतु सर्वसामान्यांनी कोरोना पासून सावधानी राखली पाहिजे असे आवाहनही करण्यात आलेले आहे.
0 Response to "आजच्या बैठकीत झाला निर्णय, महाराष्ट्रात लॉकडाउन नाही, परंतु निर्बंध कडक होणार"
टिप्पणी पोस्ट करा