या करणांमुळे औरंगबाद शहरात आज पासून जमावबंदीचे आदेश लागू- जाणून घ्या सविस्तर माहिती
कोणताही अनुचित प्रकार घड नये आणि सार्वजनिक शांतता,कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) व (३) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून डॉ.निखिल गुप्ता,पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर असे आदेशीत करीत आहे की, औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात शासकीय कर्तव्य पार पाडणाच्या व्यक्ति व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी अथवा त्याचे जवळपास कोणत्याही व्यक्तीस-
(अ)शस्त्रे, सोटा, तलवार, भाले, दंडे, बंदुका, सुरे,काठ्या किंवा लाठ्या, किंवा शारिरीक इजा करण्यासाठी
वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तु जवळ बाळगता येणार नाही.
(ब) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगता येणार नाही.
(क)दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची साधने बाळगु नये,जमा करू नये किंवा तयार करता येणार नाही.
(ड) कोणत्याही व्यक्तिची प्रतिमा अथवा प्रेते किंवा आकृत्या यांचे प्रदर्शन करता येणार नाही.
इ) जाहीरपणे घोषणा करू नये,गाणे किंवा त्यांचे ध्वनिमुळे सार्वजनिक शांतता भंग होणार नाही असे ध्वनिक्षेपण करू नये.
(फ)अशा प्राधिकार्यांच्या मते ज्यामुळे सभ्यता अगर नितिमत्ता यास धक्का पोहचेल अशी किंवा राज्याची
सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपुर्ण
भाषणे करू नये, सोंग अगर हावभाव करू नये, आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही जिन्नस
किंवा वस्तु तयार करू नये, त्याचे प्रदर्शन करू नये किंवा त्यांचा जनतेस प्रसार करता येणार नाही. तसेच आणखी असे ही आदेशीत करीत आहे की, संपूर्ण औरंगाबाद पोलीस आयुक्तालय ह्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास, निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणुक काढण्यास मनाई करण्याचा आदेश देत आहे. हा आदेश अत्यंविधी, विवाह समारंभ आणि कर्तव्यावरील कोणतेही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी तसेच पोलीस उपआयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, आणि पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी दिलेल्या परवानगी नुसार घेतलेल्या कार्यक्रमांना हा आदेश लागु होणार नाही.
औरंगाबाद शहर, दिनांक. 9०/०९/२०२१महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये आदेश लागू करण्यात आले आहे.
औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये विविध राजकीय पक्ष तसेच संघटना तर्फे त्यांच्या निरनिराळया मागण्यांच्या तसेच इतर विषया संदर्भात काही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
- दि.१७/०९/२०२१ रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे.
- दि.१९/०९/२०२१ रोजी अनंत चतुर्थी (गणेश विसर्जण) आहे.
मराठा आरक्षण/ओबीसी आरक्षण संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाने मराठा/ओबीसी समाजात असंतोष असून त्या अनुषंगाने विविध राजकीय पक्ष/संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण रद्द केल्याने त्या विरोधात विविध राजकीय पक्ष/संघटना यांचेकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
संसदेत कृषी विषयक विधेयक मंजुर झाले असून सदर विधेयकास शेतकरी, विविध राजकीय पक्ष/संघटना यांचा विरोध असून त्या अनुषंगाने त्यांचेकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
औद्योगिक तसेच इतर संघटीत/असंघटीत कामगार संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
इंधन दरवाढी विरोधात शासनाविरुध्द विविध राजकीय पक्ष/संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. आगामी काळात महानगरपालिकेतर्फे मालमत्ता कर वसुली मोहीम राबविण्यात येणार असून त्यास काही नागरिकांकडून,राजकीय पक्ष संघटनांकडून विरोध होऊन त्यांचेकडून आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद शहर हे संवेदनशिल असल्याने कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधीत राहावी आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३)अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास उल्लंघन करणारी व्यक्ती ही महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चेक लम १३५ अन्वये कारवाईस पात्र राहील.सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही आमचे अधिनस्थ परिमंडळाचे सर्व पोलीस उप-आयुक्त, विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्राधिकृत करीत आहोत.
0 Response to "या करणांमुळे औरंगबाद शहरात आज पासून जमावबंदीचे आदेश लागू- जाणून घ्या सविस्तर माहिती "
टिप्पणी पोस्ट करा