औरंगाबाद : भाजप नेते व खासदार भागवत कराड यांना केंद्रात अर्थराज्य मंत्रीपद मिळालं आहे. डॉ.कराड यांना मंत्रिपद मिळणार अशी चर्चाही नव्हती. मात्र काल अचानक त्यांचे नाव मंत्रिपदासाठी पुढे आले आणि कराड चर्चेत आले. आपल्याला मंत्रिपद कसं मिळालं? या सदर्भात स्वत: भागवत कराड यांनीच आपली प्रतिक्रया व्यक्त केली आहे. डॉ.भागवत कराड यांनी आज मंत्रिपदाचा पदभार स्विकारला आहे . त्यानंतर त्यानी मीडियासोबत ही संवाद साधला. त्यांनी सांगितले की,
मी मंत्री होणार याची मला कोणत्याही प्रकारची कल्पना नव्हती. मला कोणत्याही ऑफिसमधून फोन आला नव्हता. पण शपथविधीच्या दिवशी मला फोन आला आणि मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी तयार राहा असं सांगितलं.त्यानंतर मी मोदींची भेट घेतली आणि संध्याकाळी माझा शपथविधी पार पडला, असं भागवत कराड यांनी सांगितलं.
कोन आहे भगवत कराड :-
डॉ भागवत किसनराव कराड हे डॉक्टर आणि
भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आहेत . ते महाराष्ट्रातील
भारतीय संसदेचे वरील सभागृह असलेल्या
राज्यसभेचे सदस्य आहेत . ते दोन वेळा
औरंगाबादचे महापौर होते .
[१] [२] []] []] ते महाराष्ट्रातील भाजपचे संघटनात्मक सदस्य आहेत.जेव्हा मंत्रिमंडळाची मुदतवाढ झाली तेव्हा ते
दुसर्या मोदी मंत्रालयात राज्यमंत्री झाले.
0 Response to "केंद्रीय मंत्री होण्याची कल्पना नव्हती ; खासदार भागवत कराड यानी दिली प्रतिक्रया ? "
टिप्पणी पोस्ट करा